पोस्ट्स

फॉलोअर

आज वाचा

कष्टाची शिदोरी आणि आशीर्वादाची किमया

इमेज
  आज फोटो अल्बम मध्ये डोकावताना “विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन” पुन्हा एकदा अनुभवला !!  विद्या कॉम्प्युटर्सचा तिसरा वर्धापन दिन अर्थात ०९ फेब्रुवारी २००३, सेलिब्रेशन करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये प्रामुख्याने “जिल्हास्तरीय डान्स कॉम्पिटिशन” चे आयोजन आणि तेही “सुशील रसिक” सभागृहात !! सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता, “सुशील रसिक” गच्च भरलं होतं, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक , कवी स्व. व्यंकटेश कामतकर उपस्थित होते. इंस्टिट्यूट मध्ये रांगोळी स्पर्धा आयोजित केली होती, त्यात विद्यार्थीनींनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, इंस्टिट्यूट येथील समोरच्या जागेत रांगोळी काढण्यात आल्या, यासाठी परीक्षक म्हणून येथील महिला मंडळातील पदाधिकारी पुढे आले आणि त्यांनी ही महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. हे सारं घडत होतं, गीतकार गुलशन बावरा यांच्या शब्दांत सांगायचं झालं तर “मिले जो कडी कडी एक जंजीर बने, प्यार के रंग भरो, जिंदा तस्वीर बने”, आज या गोष्टीस २1  वर्ष लोटली, विद्या कॉम्प्युटर्स वर विश्वास ठेवून पालकांनी त्यांच्या पाल्यास आम

संगणक प्रशिक्षणाचा रौप्य महोत्सव – विद्या कॉम्प्युटर्स

इमेज
  आज पर्यन्तचा प्रवास काही सोपा नव्हता, २५ वर्षे मार्केट मध्ये टिकून राहायचं , स्वत:चं अस्तित्व निर्माण करायचं ही काही साधी बाब नाही. अवघ्या दोन संगणकावर (286 & 386 प्रोसेसर) आणि ८० चौ. फुटाच्या हॉल मध्ये सुरू झालेला हा प्रवास आज २६ संगणक  (आय-7, आय-3 प्रोसेसर) आणि २००० चौ. फुटाच्या स्व-मालकीच्या जागेत “जुळे सोलापुरातील सर्वात मोठी, अनुभवी आणि मान्यताप्राप्त संगणक संस्था” असे बिरुद मानाने मिरवीत सुरू आहे.    संगणक शिक्षण देणारी संस्था ते दर्जेदार संगणक शिक्षण देणारी आणि करिअर घडविणारी संस्था असा नावलौकिक मिळविणे, पालक आणि विद्यार्थी यांच्या विश्वासास पात्र ठरणे कधीच सहज शक्य नव्हते. सोलापुरात संगणक प्रशिक्षण देण्याच्या एस.ओ.पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) डिफाईन करणारे विद्या कॉम्प्युटर्स हे प्रथम संगणक प्रशिक्षण केंद्र, विद्यार्थ्याने संगणक प्रशिक्षण घेण्यासाठी कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी प्रत्येक कोर्स साठी विशिष्ट प्रशिक्षण प्रणाली अस्तित्वात आणली गेली, प्रशिक्षणा दरम्यान विद्यार्थ्याने किमान व्यावहारिक गोष्टींचा सराव  करणे अनिवार्य करण्यात आले त्यामुळे विद्यार्थी मित्र

हॉस्पिटॅलिटी आणि इवेंट मॅनेजमेंट उद्योग- एक उत्तम स्टार्टअप

इमेज
  हॉस्पिटॅलिटी उद्योग हा एक मोठा उद्योग आहे ज्यामध्ये करिअर करण्यासारखे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. जे फायदेशीर ठरू शकतात. तुम्हाला फूड अँड बेवरेज मॅनेजर व्हायचे असेल असेल तर अनेक करिअर मार्ग तुम्हाला यात मिळतील. अर्थात हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट हे विविध करिअर पर्याय उपलब्ध करून देणारे क्षेत्र आज अनेक युवक मंडळींना खुणावत आहे. युवक वर्गास समूहा (लोकां) सोबत काम करण्यास सोबतच नवीन आव्हाने पेलण्याची क्षमता आणि आवड असल्यास रोज विकसित होत असलेल्या हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अद्भुत संधी दडलेल्या आहेत, त्या कुतुहलाने एक्सप्लोर करायची गरज आणि मानसिकता हवी एवढचं. एक ध्यानात ठेवावं लागेल जर तुम्ही व्यवस्थापक भूमिकेत असाल तर हा एक स्पर्धात्मक उद्योग आहे, अर्थात स्पर्धां आजकाल प्रत्येक क्षेत्रात आहे. रोज बदलणाऱ्या यां जगात नवं-नव्या आव्हानास सामोरे जावं लागेल. जिद्द, चिकाटी ही गुणं वैशिष्टं जोपासावी लागतील हे मात्र नक्की !        हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्य – आतिथ्यशिलता हा उद्योग वैविध्यपूर्ण आहे यामध्ये विविध भूमिकांचा समावेश आहे. हे क्षेत्र सेवा क्षेत्रात मोडते, जसे की रेस्टॉरंट, हॉटेल उद्योग, कार्यक्

कोडिंग म्हणजे काय ?

इमेज
  कोडिंग, आजकाल यश संपादन करण्यासाठी परवलीचा शब्द ! अर्थात यशाची व्याख्या ज्याची त्याची वेगळी असू शकते, आणि ती वेगळी असावीच, नाही का? संगणक वापरकर्ते (एंड युजर) आपण सगळेच असतो पण जर तुम्हाला तुमचा हा रोल बदलायचा असेल तर कोडिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. संगणकास सांगता यायला हवं की तुम्हाला काय आउटपूट त्याच्याकडून हवय, मग हे सांगणार कसं? तर त्यासाठी आपण ज्या प्रकारे विविध भाषा मध्ये संवाद साधतो अगदी तसचं संगणका सोबत संवाद साधून त्यास आदेश देता येणं, आणि हवं ते आउटपूट मिळवणं हे कौशल्य आत्मसात करणं म्हणजे कोडिंग.. एखादा प्रोग्राम म्हणजे तर काय हो ? तर्कशुद्ध (लॉजीकल) सूचनांचा सेट , मग ह्या तर्कशुद्ध सूचना द्यायच्या कशा ? त्यासाठी कोणता फॉरमॅट असतो ? तर्कशुद्ध सूचना देता येणं हे एक कसबं आहे, हे शाळेतच मुलं शिकू शकतं असतील, तशी मुलांनी तयारी केली तर त्यांच्या शाळेच्या अभ्यासक्रमात देखील याचा फायदा ते मिळवू शकतात. तर्कशुद्ध सूचना द्यायच्या असतील तर तसा विचार करावा लागेल, एंड युजरची गरज काय आहे? याचा विचार करावा लागेल, एकदा आउटपूट काय हवं आहे हे ठरलं की मग इनपुट काय आणि कसं स्विकारायचं ? या

माऊली

इमेज
  पंढरीचा पांडुरंग , विठ्ठल भाविकांचे श्रद्धास्थान , संतांचे प्रेरणास्थान , भक्ती भावनेचा अतूट धागा विठ्ठला भोवती गुंफला गेला आहे , “ श्री विठ्ठल महाराष्ट्राचे परमदैवत आहे.” वर्षातून चार वेळा अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून वारकरी वारी करतात आणि पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेतात , डोळाभेटच म्हणायची ती ! दर्शन होताच जन्म धन्य झाल्याचे समाधान मिळते. हे समाधान खूप मोठं असतं ते फक्त अनुभवता येतं आणि शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूर कडे निघतात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने विठ्ठलाचे स्मरण करीत असतो , भक्तीत तल्लीन असतो , वारी अनुभवता आली पाहिजे , वारीची शिस्त , वारीत केली जाणारी सेवा आणि दिंडीत दिसणारी , अनुभवास येणारी माणुसकी ! या दिंडीत सहभागी सगळे वारकरी सारखेच भासतात कारण प्रत्येकाचा भाव एकच असतो “विठ्ठल” , त्याच्याशी ते सगळे एकरूप झालेले असतात. शेकडो वर्षापासून संतांच्या आणि सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यामध्ये दिंड्या सहभागी असतात , वारी एक साधना असून दिंडी हे साधन आहे असं मानणारा हा संप्रदाय , भागवत संप्रदा

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

इमेज
  ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.   ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? कोणत्या वि

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

इमेज
  संगणकीय जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवे नवे प्रयोग करताना आता आपल्याला पहायला आणि अनुभवाला मिळत आहे. येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होवू शकेल अस वाटते. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा जिथे गरज असेल ते क्षेत्र ! सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा हा डेटाच असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाला मिळालेली नवी देणगी आहे याच्या जोरावर बरेच प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तस पाहिलं तर आरोग्यसेवा हि मनुष्यबळावर अवलंबून आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यरीत्या वापरली गेल्यास, या क्षेत्रास त्याचा खूप मोठा फायदा होताना पहायला मिळेल. संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांची एक टीमच या विषयावर कार्यरत आहे नक्कीच हि मंडळी एका नव्या ए.आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या अव